kailas hale

महान तपस्विनी गंगा सुरवन्तीच्या पोटी आयोनी संभव जन्म घेऊन श्री बीरदेवांनी धनगर कुलाचा उद्धार केला. बिरदेवांचे बालपण चिंचली तालुका रायबाग येथे मायाक्काच्या घरी गेले. तेथे त्यांनी काही दिवस मेंढ्या राखल्या. काही देव्पानाच्या खुणा भक्तांना दाखवल्या. मेंढ्या राखत असता त्यांनी नारद पुरचा राजा नारायणाचा (मामाचा) गर्व हरण केला व मामाची कन्या कामवती बरोबर विवाह केला. तेथून त्यांनी अग्र्यायानी नदी तीरी मूरगुंडी (जि. बेळगाव) येथे घोर तपशर्या केली. त्यांच्या तापला प्रसन्ना होऊन पंढरीचा देव श्री विठ्ठलाने बीरदेवास भेट देऊन तप समाप्ती केली. श्री विठ्ठल बीरदेव ही हरिहरची जोडी भक्तीला भुकेली असल्याने त्यांनी अनेक भक्तांना भेट दिली. ऐनापुरात त्यांनी भक्त कोडया ननगोडाची कन्या सिधाव्वा ही भागीरथी रूपाने विठ्ठलाची मानस कन्या झाली. श्री बीरदेवाने विठ्ठलाच्या सहकार्याने कर्नाटकात अत्याचार करीत माजलेल्या गजलिंग आणि रेदेसुर या दोन्ही महाबलाढ्या दैत्याच्या वध (संहार) केला.
*श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभले &जय बाळूमामा...