मचछिंद्रनाथांची सोण्याची विट. मचछिंद्रनाथानी गोरक्षची परीक्षा घेतली. नवनाथ भक्तिसार
Автор: kathan Dharmache {कथन धर्माचे}
Загружено: 2022-12-29
Просмотров: 1229
मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह, समाराधना, गहिनीनाथास गोरक्षाचा उपदेश
मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्ग चालत चालत तैलंगणांत गेले. तेथें त्यांनीं गोदावरी संगमीं स्नान करून श्रीशिवाचे पूजन केले. पुढे आंवढ्यानागनाथ, परळीवैजनाथ आदिकरून तीर्थे केल्यावर महारण्यात गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मीकिऋषीचे स्थान आहे, तेथे ते आले. ते अरण्य महाभयंकर होते, वाट देखील धड समजेना; अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिऊन गेले. त्याचे कारण असे होते कीं, स्त्रीराज्यातून निघतांना त्यांना मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजू देता नाथांनी झोळीत ठेविली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीने त्यांच्या जिवात-जीव नव्हता. ही सर्व भीति गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती, नाही तर मच्छिंद्रनाथास भीति कशाची असणार ! तो मार्गात चालत असतां गोरक्षास विचारी की, ह्या घोर अरण्यात चोरांची धास्ती तर नाहींना ? हे ऐकून गुरूला चोराचे भय कशासाठी असावे, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली. गुरूजवळ काही तरी जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासतां झोळींत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्याने एकच गोंधळ केला. त्या दुःखाने तो गडबडा लोळू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाच्चासारखा चौफेर फिरू लागला. त्याने गोरक्षास नाही नाही ते बोलून शेवटी निघून जा. तोंड दाखवू नको, इतकेसुद्धा सांगितले.
मच्छिंद्रनाथाचे ते काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उभाच राहिला व त्याचा हात धरून त्यास पर्वतशिखरावर घेऊन गेला. जातांना पर्वतावर गोरक्षाने सिद्धयोगमंत्र जपून लघुशंका केली. त्यामुळे तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरूस विनंति केली. ते अघटित कृत्य पाहून त्याने गोरक्षाची वाहवा करून त्यास शबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हटले, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करू ? अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथानेेंे त्याची पुष्कळ वाखाणणी केली.
गोरक्षानेंगुरूच्या बोलण्याचा तो झोंक पाहिला, तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेविली होती माझ्या मनात अशी इच्छा होती की, आपल्या देशी गेल्यावर साधुसंतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी. ते ऐकून तुमचा हा हेतु मी पुरवितो, म्हणून गोरक्षाने त्यास सांगितले. मग गोरक्षाने गंधर्वास्त्रमंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली; त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला. तेव्हा गोरक्षाने सांगितले की, आणखी काही गंधर्वांस बोलाव आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, संतसाधु, देव, गंधर्व, दानव किन्नर या सर्वांस येथे आणावे. कां की, आम्हांस एक टोलेजंग जेवणावळ घालावयाची आहे. मग चित्रसेनाने शंभर गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविले. ते गंधर्व पुष्कळांस आमंत्रण करून त्यांस घेऊन आले. नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मीकि, आदिकरून मुनिगण तेथे थोडक्याच वेळां येऊन पोहोचले.
नंतर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की, भोजनसमारंभास पुष्कळ मंडळी जमली आहे; तरी तुमची मी मागे मार्गांत टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतो, ती घेऊन समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथाने त्याचे समाधान केले कीं, बाळा तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला एक सोन्याची वीट घेऊन काय करावयाची आहे ? मग गोरक्ष म्हणाला, सर्व यथासांग होईल; पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, मजकडे काही नाही, असे बोलून त्याने चरणांवर मस्तक ठेविले व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करितो, आपण काही काळजी न करितां स्वस्थ असावे असे सांगितले.
नंतर त्याने अष्टसिद्धींस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम पुढें अवतार घ्यावयाचा आहे, त्या वेळीं मी निवृत्ति या नांवानें प्रसिद्धीस येईन व हा गहिनीनाथास अनुग्रह करील; यास्तव यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्यें प्रवीण करावें. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागलाच अनुग्रह देवविला. तसेंच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला हा समराधनेचा समारंभ एक महिनाभर सतत चालला होता. मग गोरक्षानें कुबेरास सांगितलें कीं, तूं हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि ह्याच्या मोबदला आम्हांस अमोल वस्त्रें-भूषणें दे; म्हणजे तीं सर्व मंडळीस देऊन रवाना करतां येईल. हें भाषण ऐकून कुबेरानें येथील धन येथेंच असूं द्या. आज्ञा कराल त्याप्रमाणें वस्त्रालंकार मी घेऊन येतों. मग त्यानें वस्त्रांचीं दिंडें व तऱ्हेतऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. तीं वस्त्रें भूषणें सर्वांना दिलीं; याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठया सन्मानानें सर्वांची रवानगी करून दिली.
समारंभ झाल्यावर उपरिक्ष वसूसमागमें मीननाथास सिंहलद्वीपास त्याच्या तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिलें. त्यानें मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केलें व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हां मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळें तिच्या डोळ्यांस पाणी आले. तें पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तूं कांहीं चिंता करुं नको, असें सांगून उपरिक्षवासु आपल्या स्थानीं गेला. मग ती मुलावर प्रीति करून आनंदानें राहिली.
दहाशें या वर्षीं त्यांनीं समाधि घेतल्या.
कबरीच्या घाटाच्या समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की, पुढें जानपीर असें नांव जालंदरास दिलें. गैरीपीर हें नांव गहिनीनाथास ठेविलें. मच्छिंद्राचें मायाबाबलेन व कानिफाचें कान्होबा अशी नांवें ठेवून तेथें यवन पुजारी ठेविले. कल्याण कलयुगीं बाबाचैतन्य यांची समाधि होती, पण तें नांव बदलून राववागशर असें नांव ठेविलें. गोरक्ष आपल्या आश्रमीं सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: